Saturday 1 March 2014

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले केंजळगड ।।


किल्ल्याची ऊंची :  ४२६९ मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
 डोंगररांग: महाबळेश्वर
जिल्हा : सातारा 
श्रेणी : मध्यम
 
केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.

इतिहास :
बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला.

पहाण्याची ठिकाणे :
कोर्लेमार्गे सुमारे दोन तासांच्या आल्हाददायी निसर्गभ्रमणानंतर आपण केंजळगडाच्या खांद्यावर जाऊन पोहचतो. माचीवर पूर्वेकडच्या अंगाला सपाटीवर पाच, सात खोपटांची वस्ती आहे, तिला ओव्हरी म्हणतात. मागे केंजळचा भला मोठा खडक उभा असतो. या काळ्या पहाडाच्या माथ्यावर मजबूत झाडी व गवताचे रान माजलेले दिसते. येथे मार्गदर्शक नसेल तर झाडीत उगाच भटकत बसावे लागते, म्हणून मार्गदर्शकाच्या सहाय्याने झाडीतून जाणार्‍या वाटेने वर चढू लागले की आपण गडावर पोहचतो. माथ्यालगतच या गडाचे वैशिष्ट्य आपल्या निदर्शनास येते, ते म्हणजे एवढ्या उंचीवर उभ्या कातळात कोरून काढलेल्या पायर्‍या होत. ज्या किल्ल्याच्या पायर्‍या फार श्रम करून अवघड जागी खडकात कोरून काढल्या आहेत, अशा मोजक्या किल्ल्यांमध्ये केंजळगड अग्रभागी आहे. डोंगर शिखरावरील कातळात पूर्ण लांबीच्या ५५ उंचच उंच पायर्‍या आहेत.

रायरेश्वरहून येतांना काळ्या कातळभिंतीपाशी येऊन पोहोचलो की, उजव्या हातास वळसा घालून पंधरा वीस मिनिटांत आपण त्या कातळ पायर्‍यांपाशी येऊन पोहचतो. पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते. या गुहेत काळ्या रंगाचे कोळी मोठ्या संख्येने आढळतात. या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पायर्‍यांच्या सुरवातीला दोन्ही बाजूला देवडयांचे अवशेष आहेत. पायर्‍या संपता संपता येथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारं जोते फक्त दिसते. माथा गाठल्यावर तटाजवळ एक प्रशस्त खोदलेले तळे आहे. या तळ्याचे पाणी मोठे मधुर आहे.
गडाचा घेर हा लंबवर्तुळाकार आणि छोटाच आहे. चारही बाजूंनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आहे. गडाच्या एका अंगास वाई प्रांताच्या दिशेस थोडी फार तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरूजही आहे. एक सुकलेले टाके तसेच काही इमारतींचे भग्नावशेषही आढळतात. येथेच वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एक चांगली मजबूत अशी इमारत आढळते साधारण कोठारासारखी तिची रचना आहे. काही कागदपत्रांच्या उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्वराच्या दिशेने ओसाड माळ आहे. कोठारापासून दुसर्‍या दिशेने चालत गेले असता आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुन्याचे घाणे असणे म्हणजे गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेले असले पाहिजे. पण गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुसर्‍या चुन्याच्या घाण्यापुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती आहे. इथल्या रांगड्या निसर्गाला साजेश्या रांगड्या देवतांच्या इतरही काही मूर्ती आसपास आहेत. केंजळगडाची ही डोंगररांग माथ्याकडे हिरवाईने नटलेली दिसते. पावसाळ्या नंतर नजीकच्या काळात आल्यास सारी धरणी हिरव्या गवताने आच्छादलेली असते. अशा अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो.

पोहोचण्याच्या वाटा :
१ कोर्लेमार्गे :-
भोरहून सकाळी साडेसात वाजता कोर्ले या गावी जाण्यासाठी एस्‌टी बस येते. तासाभरात बस कोर्ल्याला पोहोचते. तेथून पश्चिमेला केंजळचा मार्ग जातो. तर उत्तरेला रायरेश्वराचे पठार दिसते. भोरहून आंबवड्याला दिवसातून दहा बसेस येतात. आंबवड्याला उतरूनही कोर्ल्याला पायी ( साधारण ६ कि.मी ) जाता येते. चिखलवडे, टिटेघरकडे येणार्‍या एसटी नेही कोर्ले गाठता येते. कोर्ल्याहून गडावर दोन तासात पोहचता येते.

२ वाईमार्गे :-
वाईमार्गे गडावर येण्यासाठी एक मार्ग आहे. वाईहून खावली गावी यावे. खावली गावी जेथे एसटी थांबते तेथून थोडे पुढे ५ ते १० मिनिटे चालल्यावर उजवीकडे गडावर जाणारा रस्ता दिसतो. अर्धा गड चढून गेल्यावर थोडी वस्ती लागते. येथपर्यंतचा रस्ता ही एक कच्ची सडक आहे. येथून पुढे पायवाटेने अर्धा - एक तासात आपण गडावर येतो. गडाच्या कातळाजवळ आल्यावर आपण डोंगरसोंडेवरुन येणार्‍या वाटेवर येतो.

३ रायरेश्वरमार्गे
रायरेश्वरच्या देवळाकडे पाठ करून उजवीकडील शेताच्या बांधावरून टेकडीखाली उतरले की समोर केंजळगडाचा घेरा, बालेकिल्ला आणि रायरेश्वरला जोडणारी डोंगररांग स्पष्ट दिसते. आणखी दहा मिनिटे चालल्यावर पठार संपते. तेथून खाली उतरायला एक लोखंडी शिडी आहे. शिडीने खालच्या धारेवर उतरावे, उजवीकडे खाली खावली गाव दिसते. समोर केंजळगडाच्या पाठीमागे असलेल धोम धरणातील पाणी आणि त्याच्याच पलीकडे असलेला कमळगडाचा माथा आपल्याला खुणावत असतो. त्याच वाटेने दीडएक तास चालत राहिले की केंजळगडाच्या उभ्या कातळभिंतीशी येऊन पोहचतो.

राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही. तंबू ठोकून राहता येऊ शकते, पण वारा प्रचंड असतो. दुसरी सोय म्हणजे ओव्हरीची वस्ती, जेमतेम पाचसात घरांची ही आदिवासी वस्ती असली तरी तेथील केंजळाई देवळात दहाबारा जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.


जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.


पाण्याची सोय : गडावरील तळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते. कातळ पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते, या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे.


जाण्यासाठी लागणारा वेळ : रायरेश्वर रस्ता ते केंजळगड ३ तास लागतात.


|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Friday 6 December 2013

शिवरायांचे शिलेदार - हिरोजी फर्जंद

॥ लाल किल्ला , दिल्ली ॥

सन ११ जून १६६५ च्या तहानुसार छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबास भेटण्यासाठी आग्र्यास रवाना झाले.औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसा राजे औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले.पण औरंगजेबने दरबारात राजेंचा अपमान केला,तसेच त्यांच्या निवासस्थानाभोवती पोलादखानाचे पहारे बसविले.स्वत:छत्रपती शिवराय,युवराज संभाजीराजे कैदेत अडकल्यामुळे स्वराज्यावर मोठे संकट उभे राहिले होते.

छत्रपती शिवरायांनी आपल्या चतुराईने संभाजीराजेंना मोघलांची मनसबदारी मिळवून दिली त्यामुळे संभाजीराजे मुक्तपणे संचार करू शकत होते,तसेच हिरोजी व मदारी म्हेतर यांस राजेंनी आपल्या सोबत ठेवून आपल्या सोबतच्या इतर मावळ्यांना बाहेर पाठविले.संभाजीराजेंना मनसबदारी मिळाल्यामुळे त्यांनी राजेंच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू केले.संभाजीराजेंनी मावळ्यांना आग्र्याच्या बाहेर ठिकठिकाणी तैनात ठेवले.छत्रपती शिवरायांनी आजारी पडण्याची युक्ती करून आपली तब्येत चांगली व्हावी म्हणून आग्र्यातील मंदिर,मशिदी,गोरगरिब जनतेला मिठाईचे पेटारे पाठवयास सुरूवात केली.सुरूवातीस पोलादखानाचे सैन्य पेटारे काळजीपणे तपासत होते पण नंतर ते पेटारे तपासण्यास कुचराई करू लागले.अखेरीस संधी साधून दि १७ ऑगस्ट १६६६ ला राजें वेशांतर करून पेटारे घेऊन निघून गेले(राजें आग्र्यातून कसे निसटले याबद्दल इतिहासकारांमध्ये वादविवाद आहेत). राजेंच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद छत्रपतींचे कपडे घालून झोपला.या घटनेच्या वर्णन सभासदाच्या बखरीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हिरोजी फर्जंद पलंगावरी निजला होता.तो चार प्रहर रात्र व तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात,तो राजे शेला पांघरून निजलेले.पोर पाय रगडित होता.पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले?पोर म्हणतो की,'शीर दुखते'ऐसे पाहोन लोक जातात.तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता.तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन,आपली पांघरूणे,चोळणा,मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन,बाहेर आला चौकीदारास पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते,कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मना करणे.आपण औषध घेऊन येतो.म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले.रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरिला.

संभाजीराजे,हिरोजी फर्जंद,मदारी म्हेतर यांच्यामुळे राजे सुखरूप औरंगजेबाच्या तावडीतून निसटले. 

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Friday 22 November 2013

॥ आपण आणि आपले गड-किल्ले ॥

|| सह्याद्री ||
|| किल्ले शप्तस्रंगी ||
|| किल्ले राजगड ||
|| किल्ले  तैलबैल ||
Add caption
|| किल्ले बलवंतगड ||
|| किल्ले वारुगड ||
|| किल्ले केंजळगड ||
|| किल्ले पदरगड ||
|| किल्ले तांदुळवाडी ||
|| किल्ले कैलासगड ||
|| किल्ले नळदुर्ग ||
|| किल्ले राजगड ||
।। किल्ले विजयदुर्ग ।।
।। हरणे दुर्ग ।।
|| किल्ले हरिहरगड ||
|| किल्ले सिंहगड ||
|| किल्ले प्रबळगड ||
|| काल्वंती किल्ले प्रबळगड ||
|| किल्ले माहुली ||
|| किल्ले वासोटा ||
|| किल्ले तोरणा ||
|| किल्ले बाल्य ||

|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रत्नदुर्ग ।।

|| किल्ले रत्नदुर्ग ||








किल्ल्याची ऊंची : ---------- मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांग: कोकण.
श्रेणी : अत्यंत सोपी .
जिल्हा :  रत्नागिरी.
 
रत्नांगिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणार्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्नदुर्ग रत्नांगिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

इतिहास : 
 रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहमनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडुन जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणार्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनार्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरुन संपूर्ण रत्नांगिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. रत्नांगिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नांगिरी शहराचा नजारा दीपगृहावरुन बघण्यासाठी संध्याकाळी ५.०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.

गडावर जाण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता असून किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे श्री भागेश्र्वर मंदिर आहे. या मंदिराच्या खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर सुंदर चित्रे केरलेली असून मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे.

राहण्याची सोय : नाही.

जेवणाची सोय : नाही.

पाण्याची सोय : मंदिराजवळ पिण्याचे पाणी मिळू शकते.
 
|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


Wednesday 30 October 2013

|| हिंदवी स्वराज्या चे साक्षीदार महाराष्ट्रातील गड-कोट ||

दिवाळीच्या सूट्टीत आणख एक आवडीचा प्रकार म्हणजे किल्ला...आता बाजारात रेडिमेड किल्ले मिळत असले तरी  हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार महाराष्ट्रातील गड-कोट.

किल्ले रायगड
किल्ले तुंग
किल्ले तोरणा
किल्ले पुरंदर
किल्ले जीवधन
किल्ले प्रतापगड
गड-कोट
किल्ले सदानंदगड
किल्ले सलोटा
माथेरान
मोर-मुल्हेर-हरगड-सलोटा-स्वालेर
किल्ले रायगड
सह्याद्री पर्वत रांग
सह्याद्री पर्वत रांग
"उभाच राहिन मी सांगेन गाथा तुमच्या  पराक्रमाची,
आठवण सदा करून देईन मराठ्यांच्या तेजस्वी ईतिहासाची"    
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जय गड-कोट॥