Tuesday 4 June 2013

॥ शिवराज्यभिषेक सोहळा शिवतीर्थक्षेत्र किल्ले रायगड ६ जून ॥


मोगलाईचा अस्त  होऊन हिंदवी स्वराज्याचा स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितिजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी ५ जूनला मध्यरात्रीपासून राजाभिषेक प्रक्रिया सुरु करून "" ६ जून इ.स. १६७४ "" रोजी किल्ले रायगडावर राजांचा राज्याभिषेक सकाळी ७ वाजता झाला…. हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपति आणि राजे म्हणून पहिला दरबार भरवला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.
स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपति झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवराय बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.


शिवरायांनी राजाभिषेकासाठी ६ जून हीच तारीख का निवडली ,

मुहूर्ताची वगेरे वाट नव्हे तर आपल्या कर्तुत्वाची जाणीव दाही दिशांना आणि आलम दुनियेला व्हावी त्याचवेळी मोघलांना ह्या देशात स्वतंत्र स्वाभिमानी राज्याची स्वराज्याची स्थापना झाली हे जगजाहीर करण्यासाठीच महाराजांनी ६ जून हि तारीख जाणीवपूर्वक निवडून मोगलांना आपल्या ढासळत्या डोलाराची जाणीव करू दिली .त्यांचा तिळपापड केला.
जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता त्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता कारण दक्षिणायन उत्तरायण भानगड. परंतु महाराजांना वेगेवेगळ्या शत्रूंच्या वेगळ्या भानगडीवर लक्ष देणे आवश्यक होते .लोक दक्षिणायन वर्ज्र मानतात. परंतु महाराज दक्षिणायन आवर्जून दक्षिणायन म्हणजे जून महिना निवडतात कारण शत्रूला चकमा देणे .राज्य राहिले तर राजाभिषेक होईल ना, म्हणून राज्य रयत ह्यांची काळजी अगोदर. मुहूर्त पंचांग आणि योग्य संधी याचा काही संबंध नसतो हे महाराजांनी अनेक मोहिमा आणि त्यातच राजाभिषेक या सर्वात मोठ्या प्रसंगीही सिद्ध करून दाखविले.
आणखी एक मोठा राष्ट्रीय उद्देश होता. औरंगजेबाचा सिंहासनरोह्नाचा खास कार्यक्रम ५ जून १६५९ या दिवशी झाला होता. आता तुमच्या मोगलाईचा अस्त  होऊन हिंदवी स्वराज्याचा स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितिजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी  ५ जूनला मध्यरात्रीपासून राजाभिषेक प्रक्रिया सुरु करून  ६ जून इ.स. १६७४ रोजी किल्ले रायगडावर राज्याभिषेक केला.  मोगलाईचा अस्त  होऊन हिंदवी स्वराज्याचा स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितिजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी  ५ जूनला मध्यरात्रीपासून राजाभिषेक प्रक्रिया सुरु करून  ६ जून इ.स. १६७४ रोजी किल्ले रायगडावर राज्याभिषेक केला.

महाराजांच्या राजाभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब हताशपणे उद्गारला………… " या खुदा ! अब तो हद हो गई ,तू भी उस शिवा के साथ हो गया ! शिवा "" छत्रपती "" हो गया ".
 

चला तीर्थक्षेत्र किल्ले रायगडावर जाऊ , छत्रपती शिवरायांना वंदन करू...ll

  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

No comments:

Post a Comment