Friday 22 November 2013

॥ आपण आणि आपले गड-किल्ले ॥

|| सह्याद्री ||
|| किल्ले शप्तस्रंगी ||
|| किल्ले राजगड ||
|| किल्ले  तैलबैल ||
Add caption
|| किल्ले बलवंतगड ||
|| किल्ले वारुगड ||
|| किल्ले केंजळगड ||
|| किल्ले पदरगड ||
|| किल्ले तांदुळवाडी ||
|| किल्ले कैलासगड ||
|| किल्ले नळदुर्ग ||
|| किल्ले राजगड ||
।। किल्ले विजयदुर्ग ।।
।। हरणे दुर्ग ।।
|| किल्ले हरिहरगड ||
|| किल्ले सिंहगड ||
|| किल्ले प्रबळगड ||
|| काल्वंती किल्ले प्रबळगड ||
|| किल्ले माहुली ||
|| किल्ले वासोटा ||
|| किल्ले तोरणा ||
|| किल्ले बाल्य ||

|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रत्नदुर्ग ।।

|| किल्ले रत्नदुर्ग ||








किल्ल्याची ऊंची : ---------- मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांग: कोकण.
श्रेणी : अत्यंत सोपी .
जिल्हा :  रत्नागिरी.
 
रत्नांगिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणार्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्नदुर्ग रत्नांगिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

इतिहास : 
 रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहमनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडुन जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणार्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनार्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरुन संपूर्ण रत्नांगिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. रत्नांगिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नांगिरी शहराचा नजारा दीपगृहावरुन बघण्यासाठी संध्याकाळी ५.०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.

गडावर जाण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता असून किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे श्री भागेश्र्वर मंदिर आहे. या मंदिराच्या खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर सुंदर चित्रे केरलेली असून मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे.

राहण्याची सोय : नाही.

जेवणाची सोय : नाही.

पाण्याची सोय : मंदिराजवळ पिण्याचे पाणी मिळू शकते.
 
|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥