Thursday 26 July 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले सज्जनगड ||


सज्जनगड किल्ला
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फुट उंच आहे तर पठारापासून १००० फुट ऊंच आहे.
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
किल्ल्याचा आकार : शंखाकृती
जिल्हा सातारा
श्रेणी : मध्यम
 
इतिहास :

  सातारा शहराच्या पश्चिमेस दहा किलोमीटर सज्जनगड अंतरावर हा किल्ला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.
सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्व्लायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधिव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.
रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा की.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फुट उंच आहे तर पठारापासून १००० फुट ऊंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड - चिपळूण , उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर ,अजिंक्यतारा आहे.

प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली.२ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात सज्जनगङ आले. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.
पुढे ३ नोव्हेंबर, इ.स. १६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३ डिसेंबर, इ.स. १६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नौरससातारा' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
 
गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार'असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे
आणि दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो.
गड चढण्यासाठी पायऱ्याआहेत. अर्ध्या वाटेवर कल्याण स्वामीयांचे मंदिर आहे.पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गोतमी चे मंदिर आहे.किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामीयांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत.प्रवेशव्दाराच्या डाव्या बुरुजाजवळ आम्ग्लाई देवीचे मंदिर आहे.अंगापूर च्या कृष्णा नदीच्या डोहात रामादांना रामाच्या मूर्ती ,अंगलाई ची सापडली होती.आंगलाई मंदिर समर्थांनी बांधले.रामदासांचे वास्तव्य होते शके १६०३ माघा नवमी (सन १६८२ ) समर्थांनी समाधी घेतली.समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले..श्रीराम मंदिराच्या सभामंदापात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे.मुख्य मंदिरात राम,लक्ष्मण,सीता च्या पंचधातूचा मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे.भुयारात समर्थांचे समाधीस्थान आहे.समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत.मंदिरा बाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे.दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे.मंदिरा पुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई वृंदावन आहे.माघ वद्द प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी चा उत्सव साजरा करतात.
ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावी कडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली.

गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदीर. समर्थनिर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरुन भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदीर उभारले. मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवर्‍या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोध्दार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. गुप्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे त्यात एक लांबच लांब धारदार तलवार आहे.
राममंदीर व मठाच्या मधील दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात.
गडाच्या पश्चिमे टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्य़ाचा मारुती असे म्हणतात.
गडाच्या उत्तरेस बाटेवरच गायमारुती व कल्याण स्वामी मंदिर आहे. गायमारुती देवळाजवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जाते, साधारणत: १०० मी. अंतरावर एक गुहा आहे. त्याला रामघळ म्हणतात.

नोट : सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरुपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे.कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे
 

गडावर जाण्यासाठी  मार्ग : गडावर जाण्यासाठी  मार्ग दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.

१.
परळी पासून : सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण १८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो .

 २
. गजवाडी पासून : एस.टी. महामंडळाच्या बसने सातार्‍याहून जाता येते. सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ की.मी.वर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

जाण्यासाठी लागणारा वेळ:-
गडावर जाण्यास परळीपासून साधारणता एक तास लागतो गजवाडी पासून १०० पायऱ्यांनंतर गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

जेवण्याची सोय:- आपण स्वतः जेवणाची सोय करावी.


पाण्याची सोय:- गडावर पाण्याची सोय आहे
.तरी पण आपण सोबत १ पाण्याची बॉटल ठेवाव.

राहण्याची सोय:- गडावरील
  मंदिरात १० ते १२ जनाची राहण्याची सोय होते

नोट :
वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (-by स्वप्नांची दुनिया) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

No comments:

Post a Comment