Thursday 13 September 2012

शिवकालीन तोफा ........



तोफ : लष्करातील एक महत्त्वाचे अस्र
तोफ म्हणजे अवजड बंदूक किंवा आत स्फोटक दारू भरून बार काढण्याचे यंत्र. तोफेतून अनेक प्रकारचे संहारक गोळे (क्षेप्य) उडविता येतात.. तोफ हे संहारक तसेच संरक्षक शस्त्रही आहे. ज्यांच्या कार्यासाठी विशिष्ट आधिपत्य व नियंत्रणपद्धती असते, असा विभाग म्हणजे तोफखाना होय. तोफखान्यात अनेक उपविभाग असतात. 
तटबंदीचा विध्वंस करण्यासाठी आणि तटबंदीच्या आतील लोकांवर मारा करण्यासाठी तोफांचा वापर केला जात असे .बैल किंवा हत्तीच्या गाड्यांतून तोफा वाहून नेल्या जात. लहानसहान तोफा उंटावर किंवा हत्तीवर बांधून त्यांचा फिरता तोफखाना बनवीत. त्यास सुतरनाल आणि गजनाल म्हणत. तोफगाडे ओढण्यास किमान २५० बैल लागत. दिवसाला ५ ते ६ किमी. चाल होई. तोफगोळे १५ ते ६० किग्रॅ. वजनाचे दगडी किंवा भरीव लोखंडी असत.
 

शिवकालीन तोफा :

१.लोखंडी तोफ-
२.पंचधातूची तोफ
३.अष्टधातूची तोफ
४.उखळी तोफ
५.गजनाल तोफ
६.शुतरनाल(सुतार नाळ)
७.दोजरब(दोन नळ्यांची तोफ)
८.पितळी तोफ
९.गार भांडी(तोफ)
१०.फटकडी तोफ
११.गरनाळा तोफ

याशिवाय जंबोरा(लांब नळीची तोफ) तोफा ,रेहकले (हलक्या लहान तोफा) व मंजनीक तोफ तसेच आज्ञापत्रात रामचांग्या,दुरान्या अशा तोफांचे प्रकार सांगितले आहेत.




छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज-इंग्रजांकडून तोफा विकत घेत असत . राजापूर (कोकण) येथे त्यांनी तोफांचा कारखाना काढला होता. संभाजी महाराजांनी देखील स्वतंत्रपणे तोफा बनवण्याचा प्रयत्न केला होता.

 "गावठी बॉम्ब" हे मराठी हुक्के  विरुद्ध तोफा ... 

महिना झाला, दीड महिने झाले, दोन महिने झाले, तीन महिने झाले, चार महिने झाले, पाच महिने झाले. सहाशे मावळे किल्ला अजिंक्य ठेवतायत. अरे! पुढं तसूभरं सरू देईनात. चार्र्फडला, वैतागला शहाबुद्दीन खान. शेवटी डोक्यातनं युक्ती निघाली तोफा मागे घेतल्या तर गोळे पोहोचत नाही ना...आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा आजूबाजूची सगळ्या जंगलातली, सगळी लाकडं तोडली. दीड-दोन महिने काम चालू आहे. शहाबुद्दीननं अफ्लात्म किमया केली. किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्यांनी उभा केला, लाकडी दमदमा...का? तर तोफा आता या लाकडी बुरुंजावर नेउन ठेवायच्यात. किल्ल्याच्या उंची इतक्या, अनतितनं मग! खाली डागायच्या बस्सं!!! साधी गोष्ट नाही, कौतुकं केलं पाहिजे शहाबुद्दीनचं कौतुकं!!! अरे! किल्ल्याच्या उंची इतका लाकडी बुरुंज आणि तोही केवढा पन्नास तोफा बसतील वरं आणि पाचशे सैनिक उभा राहतील वरं एवढा मोठा बुरुंज. सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले. बुरुंज उभा राहिला, तोफाही वरंचढविल्या आता उद्या बुरुंजावरुन तोफमारी चालू करायची, किल्ल्यावरं किती दिवस लढतायत बघू? रात्री सगळे थकले, मोघल शांत पडले आणि मराठे नेमके मध्यरात्री बाहेरपडले. त्या बुरुंजाच्या पुढं आले, दारुगोळा त्या बुरुंजाच्या कडेनी ठासून भरला. पूर्वी हुक्के असायचे हुक्के हणजे "गावठी बॉम्ब" हे मराठी हुक्के एका बाजूनी मोघलांना पत्ता लागू नये, मोघल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले. मोघलांचा कल्लोळ उडाला आणि तेवढ्या वेळात बुरुंजाभोवती सगळी दारू ठासली. सुरुंग पेरले, वातानी पेटवल्या आणि बघता बघता पेटली..."थुई- थुई-थुई" करत वातान पेटत गेली आणि "धाड्म-धूम" अवघा बुरुंज ढासळला, तोफांसकट खाली. मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला.

 नोट : वरील सर्व माहिती "  दुर्ग-खंड पहिला"   पुस्तकातील आहे .

1 comment: