Thursday 13 September 2012

छायाचित्रित : "गड-किल्ल्यांची अभेद्य तटबंदी"


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , महाराष्ट्राचे - || छत्रपती शिवाजी महाराज || म्हणजे महाराष्ट्राचे व तमाम मराठ्यांचे आराध्य दैवत तर गडकिल्ले आणि सह्याद्री महाराष्ट्राचा मूलाधार. 
 सुलतानांची गुलामगिरी हेच आयुष्याचे इति कर्तव्य समजणाऱ्या कणाहीन झालेल्या समाजाला महाराजांनी भानावर आणलं.एवढचं नाही तर जगाने कौतुक करावे आणि अखिल हिंदूस्थानाने अभिमान बाळगावा असं अखंड हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या साक्षीने उभे केले. बाराशेव्या शतकापासून भारतात प्रस्थापित झालेल्या आणि स्थिरावलेल्या सर्व सुलतानांच्या टोळधाडी छत्रपती शिवाजी महाराज यांनी  गडकिल्ले आणि सह्याद्री यांच्या मदतीने थोपवले. बंगाल पासून इराण-इराक पर्यंत अथांग पसरलेल्या मोंगलशाहीचा पातशहा औरंगजेबाचे सुद्धा दक्षिण विजयाचे स्वप्न स्वप्नच राहिले, ते फक्त आणि फक्त शिवराय, त्यांचे सर्व मावळे, गडकिल्ले आणि अनादी काळापूर्वी प्रगट झालेला सह्याद्री.  यां मुळेच हेच महारा­ष्ट्राचा इतिहास-वर्तमान आणि भविष्य. 


युगप्रवर्तक सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजी महाराजांना, सर्व मावळे, गडकिल्ले आणि सह्याद्रीला त्रिवार मुजरा...........!!!!

किल्ले रायगड तटबंदी

किल्ले राजगड तटबंदी (सुवेळा माची)

किल्ले राजगड तटबंदी (पाली दरवाजा)

किल्ले राजमाची तटबंदी

किल्ले तोरणा तटबंदी

किल्ले वासोटा तटबंदी

किल्ले कोर्लई तटबंदी


नोट : वरील सर्व माहिती व छायाचित्र  " शिव-सह्याद्री मासिक- अंक चौथा-सप्टेंबर- २०१२"  चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. सर्व अप्रतिम छायाचित्र हे छायाचित्रकार : रवी पवार , भूषण पाटील , हर्षद पावले , आणि त्यांचा सहकार्यांनी काढली आहेत.

No comments:

Post a Comment