Monday 26 March 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :किल्ले शिवनेरी



किल्ले शिवनेरी

किल्ल्याची उंची :- ३५०० फुट
किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- नाणेघाट
जिल्हा :- पुणे
श्रेणी :- मध्यम
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे .जुन्नर मध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये इस्ट इंडिया कंपनी मधील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर हजार कुटुंबाला सात वर्षे पुरेल एवढी सिद्ध सामुग्री आहे असा उल्लेख केला आहे ..

इतिहास :- "जीर्णनगर", "जुन्नेर" म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे . जुन्नर हि शकराजा नहपानाची राजधानी होती.सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर आणि इतर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघात हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणत वाहतूक चालत असे . यावर नजर ठेव्नायास्ठी या मार्गावरील या दुर्गाची निर्मिती करण्यात आली सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सात वाहनानंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटीच्या सत्तेखाली होता ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले . आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इसवी सन १४४३ मध्ये मलिक - उल -तुजार याने यादवाचा पराभव करून किल्ला सर केला .अशा प्रकारे किल्ला बहुमानी राजवटी खाली आला इसवी सन १४७० मध्ये मलिक उल तुजार चा प्रतिनिधी मलिक महमद याने किल्ला पुन्हा नाके बंदी करून पुन्हा सर केला 1446 मध्ये मलिक महमद च्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली . निजामशाहीची स्थापना झाली . पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगर ला हलविण्यात आली . इसवी सन १५६५ मध्ये सुलतान मुर्तीजा निजामने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजामात गरोदर असताना जाधारावानी ५०० स्वर त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले शिवनेरी गडावर श्री भवानी सिवाई तीस नवस जिजाउ ने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन त्याउपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इसवी सन १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोघलांच्या ताब्यात गेला १६५० मध्ये मोघालाविर्रूढ येथील कोळ्यांनी बंड केले यात मोघलांचा विजय झाला इसवी सन १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फीतवून किल्ल्याला माळ लाऊन सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इसवी सन १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला आणि अपयश पदरात पुढे ४० वर्षानंतर १७१६ मध्ये शाहू महाराजानी किल्ला मराठेशाहीत आणला आणि नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरित करण्यात आला.

गडावरील पाहण्यासारखे ठिकाण :- सात दरवाज्याच्या वाटेने गडावर येताना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यानंतर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यानंतर "शिवाई देवीचे " मंदिर लागते मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत . य गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे .शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोरच अंबरखाना आहे आजमितीस य अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठ्विनायासाठी केला जात असे . अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात . एक वाट समोरच असणाऱ्या टेकडावर जाते या टेकडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा जमुना याशिवाय पाण्याच्या अनेक टाकी लागतात . जिजाउच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे असा आवीभार्वातील मायलेकरांचा पुतळा " शिवकुंजा " मध्ये बसविला आहे शिव्कुन्जासामोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो .येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे हि इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायाचा जन्म झाला तिथे शिवरायाचा पुतळा बसविण्यात आला आहे . इमारतीच्या समोरच 'बदामी पाण्याचे टाक ' आहे . येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो .सुमारे दीड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासठी होत असे .गड फिरण्यास दोन तास पुरतात . वर किल्ल्यावरून चावंड नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो .

गडावर जाण्याच्या वाटा :- गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात . पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते .
साखळीची वाट :- या वाटेने गडावर याचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बस स्थानक समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे .येथे चार रस्ते एकत्र मिळतात .डाव्या बाजूने जाणार्या रस्त्याने साधारणता एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते .मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन जाते . भिंतीला लावलेल्या साखळीच्या सहाय्याने आणि कातळ खोदलेल्या पायरया च्या साह्याने वर पोहचता येते . हि वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊन तास लागतो .
सात दरवाज्याची वाट :- शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायरायशी घेऊन जातो . या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात . पहिला महादरवाजा , दुसरा पीर दरवाजा , तिसरा परवानगीचा दरवाजा , चौथा हत्ती दरवाजा , पाचवा शिपाई दरवाजा ,सहावा फाटक दरवाजा , आणि शेवटचा सातवा दरवाजा म्हणजे कुलाबकर दरवाजा .. या मार्गे किल्ल्यावर पोहोचन्यासाठी दीड तास लागतो .
मुंबईहून माळशेज मार्गे :- जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यानंतर ८ ते ९ किलोमीटरवर 'शिवनेरी १९ किलोमीटर ' अशी एक पती रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते . हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो .या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो .
राहण्याची सोय :-या किल्ल्यावर शिव कुन्जाच्या मागील बाजूस असणाऱ्या व्हरानड्या मध्ये १०-१२ जनाची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :- किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपणच स्वतःच करावी
पाण्याची सोय :- गंगा आणि जमुना या टाक्या मध्ये बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे .
जाण्यासाठी लागणारा वेळ :-साखळीच्या मार्गे पाऊन तास आणि सात दरवाजा मार्गे दीड तास ...
 


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .



No comments:

Post a Comment