Monday 4 June 2012

|| हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडचा इतिहास ||


|| हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड ||

काळ आणि गांधारी नादयानी वेढलेल्या रायगडचे उत्तर अक्षांश १८*-१४' आणि पूर्व रेखांश ७३*-२०' आहे समुद्र सपाटीपासून २८५१ फुट उंच असणारा शिवरायांचा रायगड.

           शिवकाळापुर्वी तणस,रासिवठा,नंदादीप,रायरी या नावाने ओळखला जात असे. इ.स. १६५६ मध्ये शिवरायांनी हा रायरीचा किल्ला जावळीचा चंद्रराव मोऱ्याकडून जिंकून घेतला. त्यावेळी स्वराज्याजा कारभार राजगडावरून चालत असे पुढे स्वराज्याचा विस्तार वाढला तसा राजगडासारखा अवघड व माथ्यावर कमी जागा असणारा किल्ला स्वराज्याचा व्यापाच्या दृष्टीने कमी पडू लागले त्यामुळे शिवरायांनी आपला मुक्काम विस्तीर्ण माथा असणाऱ्या रायगडावर हलवला स्वराज्याचे सूत्रसंचालन रायगडावरून होवू लागले यासाठी रायगडावर अनेक नवीन बांधकामे करावी लागले.

           इ.स.१६७१-७२ मध्ये शिवरायांनी स्वराज्यातील किल्ले बांधणीसाठी खर्च करावयाच्या रकमेचा जाबता ( बजेट ) केला. त्यामध्ये पन्नास हजार होण रायगडासाठी राखून ठेवले आहेत एवढेच नव्हे तर त्यातील घरे,तळी,गच्ची,तट यासाठी किती खर्च करावेत हेही ठरवून दिला आहे.

           एवढी प्रचंड रक्कम खर्च करून शिवरायांनी रायगडाची उभारणी केली ती स्वत:ची राजधानीसाठी म्हणूनच ज्यावेळी शिवरायांनी हा गड पहिल्यांदा चोहुबजुने हा गड चहुबाजूने निरखून पहिला त्यावेळचे त्यांचे उदगार सभासदाने नोंदवून ठेवले आहेत तो आपल्या बखरीत लिहतो -"राजा खासा जाऊन पाहंता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचेकडे तासाल्याप्रमाणे दीड गांव उंच, पर्जन्यकाळी कडीयावरी गवत उगवत नाही आणि आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबादही पृथ्वीवर चाखोटा गड खरा परंतु तो उंचीने थोडका,दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोने बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले ,तख्तास जागा गड हाच करावा" , आणि खरोखरच शिवरायांनी आपली राजधानी याच रायगडावर वसवली या गडाचे जुने नाव रायरी होते ते त्यांनी बदलून रायगड ठेवले रायगडावर उंच राजवाडे, उपवने, तलाव, विहिरी, बाजारपेठेची रांग, घरे, गजशाळा, धान्यकोठारे यांची बांधणी करून घेतली आज जरी रायगडावर या सर्व गोष्टी अवशेषरूपाने दिसत असल्या तरी शिवकाळात त्या सर्व वास्तू डौलाने उभ्या होत्या याची साक्ष जगदीश्वर मंदिराच्या नगरखाण्यावरील रायगडच्या स्थापत्य विशारद हिरोजी इंदुळकर कोरलेला शिलालेखच देतो.तसेच रायगडावर शिवकाळात वेगवेगळी येवून गेलेली परकीय इंग्रज व्यक्तींनीही शिवकालीन रायगडचे वर्णन करून ठेवले आहे त्यातील इ.स.१६७३ मध्ये रायगडावर आलेला इंग्रज वकील टौमस निकल्स हा रायगड पाहिल्यानंतर लिहितो.




शिवरायांची कीर्ती ऐकून उत्तरेकडून रायगडावर आलेल्या कवी भुषण रायगडचे काव्यमय वर्णन केले आहे तो लिहतो -

"शिवरायांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्ती स्थान केले या किल्ल्यावरील शिव दरबार व तेथील ऐश्वर्य पाहून कुबेर लाजू लागला हा किल्ला एवढा प्रचंड विशाल आहे कि त्यात तीनीही लोकीचे वैभव साठविलेले आहे किल्ल्याखाली भूभाग जलमय पाताळाप्रमाणे ,माची म्हणजे पायथ्याच्या उंचवट्याचा भाग पुर्थ्वीप्रमाणे व वरील प्रदेश इंद्रपुरी प्रमाणे शोभतो रायगडावर शिवरायांचे रत्नखचित महाल शोभत आहेत गडावर विहीर सरोवरे व कूप विराजत आहेत".

           अशा या वैभवशाली रायगडावर हा पहिला राजा शिवरायांनी स्वत:स " दिनांक ६जुन १६७४ रोजी राज्याभिषेक करून घेतला  " हिंदुस्तानच्या इतिहासात हजारो वर्षात स्वत:चे सार्वभौम सिंहासन निर्माण केले त्याच दिवसापासून राज्याभिषेक शकाची निर्मिती करून छत्रपती शिवराय शकककर्तेहि झाले.शालीवाहनानंतर स्वत:चा शक नर्माण करणारा भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासातील पहिलाच राजा.

राज्याभिषेकानंतर लवकरच शिवरायांनी इ.स १६७७ मध्ये दक्षिणे मध्ये प्रच्चंड मोहीम काढली अवघ्या दीड वर्षात आजच्या तामिळनाडूतील आणि तत्कालीन कर्नाटकमध्ये प्रचंड भूप्रदेश व त्यामधील किल्ले जिंकून त्यांनी आपली हि मोहीम यशस्वी केली,आणि आवाका व झपाटा प्रचंड होता कि इतिहासकारांना त्या मोहिमेस दक्षिण दिग्विजय असे संबोदावे लागले.

दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर शिवरायांनी आपला पुत्र राजाराम याचे लग्न रायगडावर मोठ्ठ्या थाटात केले त्यानंतर ३एप्रिल १६८० मध्ये रायगडावर शिवरायांचे निधन झाले.
 
|| छत्रपती शिवरायांची रायगडा वरील समाधी ||
 
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 

नोट : वरील सर्व माहिती "शिवराज्याभिषेक सोहळा " या site चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment