Friday 1 June 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले तिकोना उर्फ वितंडगड ।।


तिकोना किल्ला

 किल्ल्याची उंची :- समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट
किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- पुणे
जिल्हा :- पुणे
श्रेणी :- मध्यम

पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले.

इतिहास:
इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. नेताजी पालकर कडे काही दिवस किल्ल्याची जबाबदारी होती.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळि व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजुस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.बालेकिल्ल्यावर बघण्यासारखे जास्त काहि आता शिल्लक नाहि, पण काहि ठिकाणी तटबंदी अजुनहि शाबुत आहे. वरती शंकराचे एक छोटेसे मंदिर असुन समोरच नंदी आणि पिंडीचे पुरातन अवशेष आहे. मंदिर जरी साधे असले तरी त्यातील शिवलिंग आणि त्यावरचा नाग अप्रतिम आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

१)पुणे -पुणे ते कोळवण या बसने गडाच्या पायथ्या्च्या थोडे जवळ जाता येते.

२)मुंबई- मुंबईहुन तिकोन्याला जाण्यासाठी २ मार्ग आहे. पहिला लोणावळ्याच्या पुढे दोन स्टेशनवर कामशेत, तेथुन पवनानगर (पूर्वीचे काळे कॉलनी) व पुढे तिकोनापेठ गाव. तिकोनापेठ गावातुनच किल्याची पायवाट सुरु होते. दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्यावरून पौड रोडने पवनानगर आणि तेथुन पुढे तिकोनापेठ गाव. दुधिवरे खिंडीच्या आधीचा रस्ता हा लोहगडला जातो आणि पुढचा रस्ता पवनानगर.

राहण्याची सोय :  महादेवाच्या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी लागते

पाण्याची सोय : पाण्याची सोय स्वतः करावी लागते

जाण्यासाठी लागणारा वेळ : साधारणतः पायथ्यापसून ४५ मिनिटे  ते १ तास लागतो .


नोट : वरील सर्व माहिती "महाराष्ट्र पर्यटन (Maharashtra Tourism)" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment