Monday 21 January 2013

राज्याभिषेक छाव्याचा...राज्याभिषेक रौद्राचा...राज्याभिषेक शंभुचा...

क्षत्रियकुलावतं सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय..!!!

१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती शिवराय यांचे पुत्र, राजमाता जिजाऊसाहेब यांचे लाडके नातू, थोरल्या महाराणी सईबाईसाहेब यांचे चिरंजीव धर्मवीर संभाजीराजे भोसले हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.

शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी 'राजा' झाल्याचे जाहीर केले .या संदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे -
"जून-जुलै शिवाजीराजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते,आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात."

संभाजी महाराजांचा कारभार सुरळीत सुरु झाला ,त्यांनी सर्व मंत्र्यांना सोडून त्यांना त्या त्या पदावर पुन्हा नियुक्त केले,परंतु मोरोपंत २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान वारले,आणि त्यांच्या पुत्राला पेशवाई दिली गेली.मंचकारोहण झाल्यावर त्यांनी रायगडावरून कारभार सुरु केला ,७ मे १६८० रोजी रुद्राप्पा देसाई याला लिहिलेल्या पत्रात महाराजांची राजमुद्रा दिसून येते.

अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहनात त्यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्याधीकाऱ्यांना तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे संभाजीराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवून राजसिहासानाची प्रतिष्ठा राखणे इष्ट वाटले,त्यामुळे राज्याभिषेक करण्याचा निर्णय शंभूराजांनी घेतला.इ.स.१६८१ साल उजाडले.रौद्रनाम संवत्सरातील माघ मास सुरु झाला , माघ शुद्ध ७ ,शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे जानेवारी १४,१५,१६, सन १६८१ मध्ये संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते महाराष्ट्राचे ,मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले,युवराज शंभूराजे राज्याभिषेकाने अभिषिक्त छत्रपति झाले,या मराठा रियासतीचे दुसरे धाकले धनी झाले.

मल्हार रामराव चिटणीस बखरीमध्ये राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतो -
"संभाजीराजे सिंहासनारूढ झाले,माघ शुद्ध १० गुरुवार शके मजकुरी यांस राज्याभिषेक यथाविधी विनायकशांती व पुरंदरशांती,होम करून,नंतर अभिषेक होऊन सिंहासनरूढ झाले.तोफा करविल्या"

अनुपुरानकाराने राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करताना म्हटले आहे -
"शम्भूराजांचा राज्याभिषेक सुरु झाला.रायगडावर मोठा उत्सव साजरा झाला.ग्रहमख,मातृकापूजन ,रक्षोहण,मंत्रपाठ हि धर्मकृत्ये झाली.देवपूजा,गोपूजा आचार्य,पिता-माता यांना नमस्कार ,कुलदेवता,महादेवाचे स्मरण करून आणि अलंकार धारण करून नांदीश्राद्ध,पुण्याहवाचन इ.विधी आटोपल्यावर पुरोहित व सुवासिनींनी ओवालालेल्या लोकांकडून आणि पूर्ण पात्र हातात घेतलेल्या आणि अलंकृत सुवासिनीकडून पहिल्या जाणार्या आणि निरीक्षणाने लोकांचा हेवा करणाऱ्या अशा शंभू महाराजांवर जमलेल्या ब्राम्हणादि सर्व लोकांनी अभिषेक केला .वनस्पती व नदीच्या जलाने न्हाऊ घातलेले त्यांचे शरीर शोभले.ब्रम्हदेवाने अभिषेक केलेल्या इंद्राप्रमाणे अभिषिक्त शंभूराजे त्या वेळी शोभले.अंत:पुरातील स्रियांच्या मनात भरले आणि त्यांचा मान वाढला ."

राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कैद्यांना मुक्त केले,प्रधान-मंडळातील अण्णाजी दत्तो,निलोपंत,बाळाजी आवजी,जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान-मंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला.

पेशवे ------------------------------------------ निळो मोरेश्वर पिंगळे
मुजुमदार ------------------------------------------ अण्णाजी दत्तो
डबीर ------------------------------------------- जनार्दन पंत
चिटणीस ------------------------------------------- बाळाजी आवजी
सुरनीस ------------------------------------------- आबाजी सोनदेव
सरनौबत ------------------------------------------- हंबीरराव मोहिते
दानाध्याक्ष्य ---------------------------------------- मोरेश्वर पंडितराव
वाकेनवीस ----------------------------------------- दत्ताजीपंत

भोसले घराण्यातील संभाजी महाराजांची राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या राज्मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे,तिचा आकार पिंपळ पाणी आहे

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

अर्थ :- शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील.

महापराक्रमी, धर्मवीर, शूरवीर योध्यास राज्याभिषेकदिनी त्रिवार मानाचा मुजरा...!!!

राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर छापा टाकला.रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले.आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली.

त्यानंतर मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ ८ च वर्षात छत्रपती शिवरायांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य शंभूराजांनी दुप्पट केले......खजिना तिपटीपेक्षा अधिक वाढविला आणि सैन्य दुपटीपेक्षा अधिक वाढविले.
 

नोट : : सौजन्य :- इतिहासाच्या वाटेवर.

No comments:

Post a Comment