Tuesday 12 February 2013

छत्रपती शिवराय एक युगपुरुष...


सूचना : हि पोस्ट  - अजय वीरसेन जाधवराव ( Admin - गडवाट परिवार ) यांनी गडवाट या facebook वरील ग्रौप  पोस्ट केली होती.  मला ती आवडली म्हणून मी खास आपल्या साठी इथे पोस्ट कारत आहे.



""""" छत्रपती शिवराय एक युगपुरुष...युग पुरुष म्हणजे लाखो वर्षांनी जन्माला येणारे नरश्रेष्ठ...एक जाणताराजा .
परंतु आजकाल ह्या महान युगपुरुषाला एका विशिष्ट चौकटीत बांधून त्यांचा वापर एक "brand ambassador " म्हणून सध्याच्या घाणेरड्या राजकारणा साठी केला जातो... त्यामुळे छत्रपती शिवरायांचे अनेक दुर्लक्षित पैलू जगासमोर येतच नाहीत....किंवा ते पैलू जाणूनबुजून जगासमोर आणले जात नाहीत.... अहो देवगिरी साम्राज्याचा अस्तानंतर ह्या हिंदुस्तानाने खरे खुरे हिंदुस्तानी राज्य अनुभवले असे तर ते छत्रपती शिवरायांच्या रूपानेच ...८०० वर्षांचे जुलमी यवनी साम्राज्य मुळासकट उलथवून टाकणारे एक अद्वित्य व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवराय.

कोण म्हणते शिवराय कट्टर हिंदू होते त्यांनी हिंदूंचे राष्ट्र स्थापन केले, कोण म्हणते ते कट्टर मराठा होते त्यांनी मराठ्यांचे राज्य स्थपन केले तर कोण म्हणते शिवराय निधर्मी होते त्यांनी बहुजानानाचे राज्य स्थापन केले.एवढीच ओळख आहे का ह्या युग-पुरुषाची ???

अहो आज आपण जे छत्रपती बघतो किंवा आपल्या ते दाखवले जातात ते एका हिमनगाचे छोटेसे टोक आहे ह्या टोकाखाली दडलेला महाकाय हिमनग आपण पाहत नाही किंवा पहायचे धाडस आपण करत नाही ...शिवरायांच्या नावाने घोषणा देताना सर्वप्रथम नाव कुणाचे घ्याचे ह्यावर आपण वाद घालतो, शिव जयंती तिथीप्रमाणे कि तारखे प्रमाणे साजरी करण्याहून वाद घालतो... हे फारच दुर्दैवी आहे आपले. आज शिवरायांच्या विचारांपेक्षा त्यांच्या विचारांबाबत आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे दर्शवन्यातच आपण धन्यता मानतो...शिवरायांचे विचार वाटून खाण्यात ती काही आपल्या पूर्वजांची मालमत्ता नाही...शिवरायांच्या जीवनावर आधरित दोन पुस्तके अथवा कादंबऱ्या वाचून आपल्याला शिवरायांचा ५० वर्षांचा संपूर्ण इतिहास समजला असे जर कोण समजत असेल किंवा तसा आव आणत असेल तर ते हास्यास्पद आहे.

संपूर्ण शिवराय समजने हे काही एका जन्माचे काम नव्हे, त्याला कितीतरी जन्म घ्यावे लागतील. वयाच्या १८व्या आपल्या अलौकिक बुद्धीचे व प्रगल्भ युद्धनीतीचा वापर करत आदिलशाह विरुद्ध लढलेल्या पहिल्या घोषित युद्धात म्हणजे पुरांधारच्या पहिल्या युद्धात महाराजसाहेबांनी कशी सरशी केली होती ह्यावर पण चर्चा करत नाही.. महाराजानी जवळ जवळ ३५० गड-किल्ले बांधले अथवा त्यांचा जीर्नोधार केला पण त्या-प्रत्येक गड-किल्ल्याचा वापर महाराजानी का व कसा केला ह्यावर कोण वाद घालत नाही.....हल्ली चर्चा होती ती फक्त त्यांच्या धर्मकारणाची .... चर्चा करायचीच असेल तर शिवरायांच्या पराक्रमची करा...समाजकारणाची करा...राजकारणाची करा..त्यांच्या युध्नितीची करा ...आणि ह्यातूनच खरे शिवराय आपल्याला व संपूर्ण कळतील. """""
 

""" शिवरायांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा शिवरायांचे विचार जर आपण आपल्या डोक्यात खोलवर रुजवले तर हा भारत देश जगातील सर्वशक्तिमान महासत्ता होण्यास जास्त वेळ लागणार नाही  """ सच्च्या शिव-भक्ताचे हेच उद्धिष्ट असावे.

आपला,
बद्रीनाथ मदनराव कदम.

एक आवाज... एकच पर्याय...
बोला.......
|| जय जिजाऊ जय शिवराय ||


No comments:

Post a Comment