Monday 25 February 2013

|| पानिपत चा पराक्रम ||

 हा पराक्रम मराठ्याने केला आहे. 

जय हिँदुत्व ...
जय मराठा ...
|| जयोस्तो मराठा ||

अहमदशाह अब्दालीने ३,४ वेळा भारतावर आक्रमण करून प्रचंड लुटमार केली होती.नेमका पंजाबसारख्या पराक्रमी राज्यातून तो यायचा आणि लुटून जायचा.उत्तर भारतातच त्याने जास्तीत जास्त लुटमार केली होती.त्याचे लष्कर इतके मोठे होते की अब्दाली येतो आहे हे समजताच दिल्लीचा बादशाह दिल्ली सोडून पळून गेला होता.उत्तर भारतातील जे लोक आपल्या शौर्याचाअभिमान बाळगायचे आणि इतरांना तुच्छ लेखायचे तेसुद्धा शेपुट घालुन आपल्याच प्रांतात जसेच्या तसे शंढ बनल्यासारखे गप्प होते. संपूर्णभारतात कुणीही जेव्हा अब्दालीशी टक्कर घ्यायला हिम्मत करण्यास तयार नव्हते तेव्हा फक्त मराठी माणसाच्या रक्ताने उसंडी मारली.पुण्यापा सू न ८०० कोस दूर अब्दालीसोबत टक्कर घ्यायला,आपल्या मातृभूमीचे रक्षण करायला,माणुसकीचे रक्षण करायला मराठी माणूस निघाला पुन्हा एकदा अटकेपार झेंडा गाडायला.
दिल्लीच्या लाल किल्यावर कब्जा मिळवला.आणि बघतात काय की बादशाह पळून गेला आहे.अब्दालीची फौज येत आहे हे समजताच भरतपुरला पाळला ही बातमी मिळाली.असा बादशाह काय कामाचा जो परकीय आक्रमण झाल्यावर आपली जनता उघड्यावर सोडून पळून जातो.त्याचवेळी मराठी फौजेला अन्नाची कमतरता भासू लागली होती.ही कमतरता सहज भरून काढता आली असती दिल्लीला लुटून.पण मराठी फौजेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होते की कोणत्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही,स्त्रियांना त्रास द्यायचा नाही,सामान्य जनतेचा छळ करायचा नाही.म्हणून ही अन्नाची अडचण मराठी माणसाला सताऊ लागली. आणि एक माहिती मिळाली की अब्दालीने त्याचा एक खजिना कुंजपुरा येथे लपऊन ठेवलेला आहे.मराठी फौज तिकडे निघाली,कुंजपुरा जिंकला आणि त्या खजिन्यासोबतच अन्न धान्यही मिळाले आणि दोन वेळच्या अन्नाची समस्या काही दिवसांपुरती सुटली.
पुढे मराठी माणसाला कुरुक्षेत्राचे दर्शन घ्यायचा मोह आवरला नाही.कारण या फौजेत फक्त लढाऊ सेनाच नव्हती तर त्यांच्या बायका,मुले,नातेवाईक हे सुद्धा होते.आणि मराठे लढल्यावर जिंकणारच हा आत्मविश्वास या सर्वांमध्ये असल्याने भलेही युध्द फार मोठे होणार होते पण लढाऊ सेने बरोबर इतर लोकही आले.नागपूर ते कोल्हापूर पर्यंतच्या सर्व जिल्ह्यातील शूरवीर यात होते.पण पुढे परिस्थिती फारच गंभीर झाली.सर्व बाजूंनी अब्दालीचे लष्कर आले.इतर कुणाही कडून काडीचीही मदत मिळणे कठीन होते मग कुणी तलवारीनिशी मदत करनेतर अशक्यच.आणि खरे म्हणजे कुणाची गरजच नव्हती.मराठी माणूस या परिस्थितीला तोड द्यायला आणि जिंकायला पुरता समर्थ होता.पण उपाशी पोटी कोण लढू शकत?
कुणी लढो अगर न लढो मराठी माणसालाहे शक्य होते.महिनाभर्या पासून अन्नान्नदशा सहन करीत मराठी सेना,मुले बाळे,बायका,२ ते ३ अंश सेल्सिअसच्या थंडीत केवळ सुती कापडाच्या कपड्या निशी निसर्गाशीझुंज देत होते.युद्धाच्या १५ दिवस आधी पूर्ण अन्न संपले. बाजूचे लुटता आले असते आणि पोट भारता आले असतेपण तसे करणे महाराष्ट्र धर्माला अनुसरून नव्हते.मराठी माणूस गवत,झाडांचा पाला,शाडूची माती खात खंबीरपणे रणांगणात छाती ताणून उभाच होता.त्या भागातील झाडांवरचा पाला संपला.थोडेफार गवत शिल्लक राहिले असेल केवळ.पण तरीही खचला नाही इतका चिवट आणि जिद्दी मराठी माणूस होता.
आणि अखेर १४ जानेवारी १७६१ हा ऐतिहासिक दिवस उजाडला.त्या दिवशी संक्रांत होती.मराठी फौजेने कसे बसे आपल्या जनावरांना थोडासा चारदेऊन थोडेसे काहीतरी खाउन तलवार उपसली.सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान युद्ध सुरु झाले.मराठी सेनेचा तोफ खाण्याचा प्रमुख इब्राहीम गार्दीच्या तोफांनी हैराण होऊन अब्दालीचे सैन्य पळू लागले.पळता शत्रू पाहून काही मराठी सैनिक तोफांची रंग ओलांडूनपुढे निघाले आणि शत्रूवर तुटून पडले.अचानक तोफा बंद पडल्या कारण मराठी फौज समोर आली होती.अब्दालीची फौज परत वळली लढू लागली .पण उपाशी मराठी माणसाचा मारा इतका जबर होता की पुन्हा शत्रू पळू लागला.शत्रूचासर दार त्यांना रडून रडून समजाऊ लागला की पळू नका.अब्दालीने त्याची राखीव फौज पाठविली.तरीही मराठी ऐकायला तयारच नव्हते. अवाढव्य अशा आफ्गानांसमोर सामान्य शरीरयष्टीच्या मराठी माणसाच्या प्राणघातक अशा पराक्रमाला अब्दाली ७ किमी दुरूनबघत होता आणि आता आपली हर निश्चितहे समजून त्याने आपले इराणी घोडे बाहेर काढून आपल्या बेगामांना त्यावर स्वार होऊन परतीचा प्रवाससुरु करण्याचे आदेश दिले.असेच युद्ध जवळपास १.३० वाजेपर्यंत चालले.पण तेव्हापर्यंत सूर्य मराठी माणसाच्या, त्याच्या घोड्यांच्या डोळ्यावर येऊ लागला,हळू हळू माणसे,घोडे भुरळ येऊन पडू लागले.३.३० पर्यंत असेचचालले.आणि याचीच परिणीती आपल्या पराभवात झाली.अब्दालीला विश्वास बसेना की आपण विजयी झालो कसे?पण या युद्धातून तो आतला घाबरला की तिथून दिल्लीला राज्य करण्यासाठी आलाच नाही परत अफगाणिस्तान ला गेला.कारण त्याला माहित होते की हे महाराष्ट्रापासुन दूरवर उपाशी लढणारे मराठी जर इतके भयंकर आहेत तर महाराष्ट्रात आपण कसे टिकू शकू ? आपलाही औरंगजेब झाल्या शिवाय राहणार नाही.आणि यामुळेच परकीय आक्रमण नेहमीसाठी आपण या देशातून पळून लावले.म्हणूनच याला पानिपतचा विजय म्हणतात. 
आज हा पराक्रम आपल्या मराठी माणसाने केला होता याची जान ठेवायला विसरता कामा नये.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

No comments:

Post a Comment